Pages

Monday, December 17, 2012

जस्ट लाईक दॅट २० (अंतिम)

आत्तापर्यंत:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७, भाग १८, भाग १९ 

                                                                                
सगळे सोपस्कार आटपले तेव्हा आदित्यने नवीन वेळ सेट केलेल्या घड्याळात पाहिलं. त्याला घ्यायला येणारी मुलं येऊन १५-२० मिनिटं तरी झाली असणारेत. तो त्यांनी सांगितलेल्या गेट नंबर बद्दल चौकशी करायला लागला. तिथल्या एका लेडी ऑफिसरने त्याला पुढे जात असलेल्या एका पाठमोऱ्या मुलीच्या मागे जायला सांगितलं. आदित्यने थोडं पुढे होत तिला हाक मारली.
"हाय..यु गोईन टू गेट १७?"
"येस"
"ओके..आय ऍम हेडिंग द सेम वे"
"ओके"
"माय नेम इझ आदित्य परचुरे..फ्रोम पुणे"
"मी रमा फडके..मुंबई"
"ओह..तू याच फ्लाईटला होतीस का?"
"येस"
"फनी...आपण इंडियाहून सेम फ्लाईटने आलो पण आपल्याला एकमेकांबद्दल माहित पण नाही..."
"हं"
"तुझी राहण्याची अरेंजमेंट कुणाकडे आहे?" 
"मेघा पालकर म्हणून एक मुलगी आहे..तुझी?"
"जीत ठाकूर..त्याला मेल केलीय मी एक-दोन वेळा..बहुतेक त्याच्याच घरी असेल"
"ओह ओके.."
'या मुलीला बोलण्यात फारसा रस नाही वाटतंआदित्यच्या मनात विचार येउन गेला. 
'अमेरिकेला येण्यापूर्वी या मुलाने एक-दोन मेल्स केल्या..कसला बेफिकीर माणूस आहे हापुण्याहून मुंबईला आलाय असं वाटतंय की काय त्याला?' रमाचं आदित्यबद्दलचं पहिलं इम्प्रेशन!

रमा आणि आदित्यला घ्यायला दोन वेगवेगळ्या गाड्या आल्या होत्या. सामान भरलं गेल्यावर गाडीत बसताना आदित्य रमाला म्हणाला- "सी यु अराउंड"
"या..शुअर"
                                       **
आदित्य त्याच्या खोलीतून बाहेर आला. रमा बाहेर त्याची वाट बघत बसली होती. तो तिच्याकडे बघून नर्व्हस हसला. 
"झालं बोलणं?" तिने विचारलं.
त्याने नकारार्थी मान डोलावली.
"का?"
"नाही सांगितलं मी"
"तेच विचारलं मी? तू सांगणार होतास ना?"
"रमा, एक खोटं, मग दुसरं खोटं, तिसरं खोटं असं खूप वेळा खोटं बोललं की एक वेळ अशी येते की पहिल्यापासून सगळं खरं सांगत बसण्यापेक्षा नवीन खोटं सांगणं सोप्पं जातं...प्रश्न कमी, गुंतागुंत कमी!" 
"म्हणजे तू नेमकं काय बोलला आहेस?" आलेला राग लपवत चेहरा शक्य तितका नॉर्मल ठेवत तिने विचारलं.
"तुझ्याबद्दल- आपल्या एकत्र राहण्याबद्दल काहीच नाही..पण यापुढे आपण एकत्र राहिलो तर मी नक्की खरं सांगणारे असं ठरवलंय!" आदित्य वाक्य बोलून गेला आणि त्याने रमाकडे पाहिलं. रमाने मुद्दाम वाक्य ऐकून न केल्यासारखं केलं होतं.
"तुझं आईशी बोलणं झालं पुन्हा?" आदित्यने विचारलं.
"नाही..तिला आधीच माझं अमेरिकेला जाणं पसंत पडलं नव्हतं आणि त्यात मी असं काहीतरी सांगितल्यावर खूप वाईट वाटलंय तिला..बोलली नाहीये ती माझ्याशी गेले दोन दिवस!! त्यात बाबा आणि श्रीला सगळं माहिती होतं हे कळल्यावर तिने बाबांशीसुद्धा वाद घातला. श्री 'होणारा जावई' असल्याने त्याला डायरेक्ट काही बोलली नाही एवढंच"
"आणि श्रीधरचा राग? तो तरी नीट बोलतोय का?"
"अजून नाही! पण आपण एकत्र राहत नाहीये हे कळलं की पुन्हा सगळं नीट होईल..पुन्हा प्रेम आणि पुन्हा हक्कं-कर्तव्यं!" 
"तुला वाटत नसलं तरी नॉर्मल जगात रिलेशनशिप्स अशाच असतात...आणि रिलेशनशिप्स रूल द वर्ल्ड..कटू सत्य"
गर्दीतून वेगळं उठून दिसणं रमाच्या बाबतीत कायम होत आलं होतं. भारतात असताना तिने गर्दीत 'फिट' होण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 'अमेरिकेत आल्यावर असं काही करावं लागणार नाही' असं तिला एअरपोर्टवर उतरल्या दिवशी वाटलं होतं. ते काही तिच्याबाबतीत झालं नाही पण निदान 'आपल्या बाबतीत असं का होतं?' याची कारणं मात्र तिला लक्षात यायला लागली होती. 
"आदि, आपण दोघांनी 'रिलेशनशिप' प्रकारावर कमेंट करणं चुकीचं आहे नाही का?" रमाने निर्विकारपणे विचारलं. आदित्य गप्प झाला.
तेवढ्यात बेल वाजली आणि बोलणं थांबलं.
"ये दर्शु"
"अगं ये नाही..चल..आय मीन दोघेही चला..." दर्शना मागून आलेल्या आदित्यला पाहत म्हणाली.
"कुठे?"
"अगं,सगळे राजच्या अपार्टमेंटमध्ये जमतोय...मनीषा निघतेय ना संध्याकाळी...तिला गिफ्ट द्यायचंय"
"ओह ओके ओके..हो पुढे आलेच मी.."
"तू तरी रेडी आहेस का?" दर्शुने आदित्यला विचारलं.
"अ..हो.."
"मग चल.."
"अ...ओके..." आदित्य दर्शनाबरोबर पुढे गेला. रमा नाराज होत आवरायला गेली.

"थॅंक्स गाय्स...मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मिस करणारे" मनीषा
"वि ऑल आर व्हेरी हॅप्पी फॉर यु" दर्शना 
"अमेरिकन लाईफचा मला न आवडणारा अजून एक पार्ट...आपण एकमेकांबरोबर राहतो...करिअरच्या या खूप महत्वाच्या स्टेजला एकमेकांना मदत करतो...पण आपल्याला एकमेकांच्या लग्नासारखी अति-महत्वाची इव्हेंट अटेंड करता येत नाही" मेघा 
"चालायचंच मेघा" जीत 
"नाही चालायचं जीत...तू नेहमी दिवाळी,गणपतीला म्हणतोस..की 'आपण ते सगळं पुन्हा कधीतरी भारतात साजरं करूच की'...लग्नाचं काय करशील?"
"परत करेल तो लग्न" राज म्हणाला आणि सगळे हसले.
"एकदा लग्न व्हायचा पत्ता नाही आणि तुम्ही परत करायचं म्हणताय" पुन्हा हशा "आणि मेघा..मनीषाच्या लग्नाला आपण नसणारे याचं तिला जेवढं वाईट वाटत नाहीये तेवढं तुला वाटतंय" जीत मेघाला डोळा मारत म्हणाला.
"अरे काय...मी बोलले की...तुम्हाला सगळ्यांना 'खूप' मिस करणारे म्हणून" मनीषा समजवायच्या सुरात म्हणाली.
"अगं, एवढं वाईट नको वाटून घेऊ..मी तयार आहे तुझ्या लग्नाला यायला..दोन कामं कर..माझ्या प्रोफेसरला सांग की राज पुढचे काही दिवस माझ्या लग्नासाठी माझ्याबरोबर इंडियाला येणारे..आणि दुसरं माझं तिकीट काढ...मी येतो लगेच" राज 
", मी याला मिस नाही करणारे..." मनीषा हसत म्हणाली. सगळे हसले. राजचं तोंड वाकडं झालं.
"फडके-परचुरे तुम्ही का गप्प? म्हणजे रमाचं ठीके..आम्हाला ती न बोलण्याची सवय आहे..पण आदित्यतू का गप्प? एखादा परचुरीझ्म होऊन जाऊ दे.." जीत 
"बोललो असतो रे...पण माझा इतक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही..माझ्या घरून कुणी मागे लागलेलं नाही..सो मला खरंच काही सुचणार नाही..." सगळ्यांनी मान डोलावल्या.
"नितीन कधी येतोय?" मेघाने विचारलं.
"उद्या दुपारी...कालच फोन झाला माझा..त्याला आणायला एअरपोर्टला जायचंय" जीत 
"ओह..आज आला असता तर मनीषाला भेटला तरी असता" 
"अगं, त्याने फोन केला मला...त्याला कालपर्यंत माहितीच नव्हतं...काल जीतकडून कळलं त्याला...मला म्हणे...लग्नाला उभी राहिलीस की एकदा मागे वळून बघ" मनीषा म्हणाली.
"ते कशाला?" दर्शना 
"माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत ना ते कन्फर्म कर म्हणे"
"काहीही..."
"आणि ती नवीन मुलगी कधी येतेय?" राज 
"ती धन्य आहे..तिने अजिबात काहीही कळवलं नाहीये...विसा झाल्यावर पण दोन आठवड्याने कळवलं विसा झाला म्हणून...आता अचानक कळवायची की मी येत नाहीये" दर्शना म्हणाली. आदित्य आणि रमाने त्या क्षणाला एकमेकांकडे पाहिलं. जीतच्या ते लक्षात आलं. जीतने त्यांना पाहिल्याचं आदित्यला कळलं-
"अवघड असतात नाही का लोक?" आदित्य भानावर येत म्हणाला.जीतने हसून मान डोलावली.
"हं..ते तर आहेच...पण ती यायला हवी..नाहीतर पुन्हा रमाचा गोंधळ होईल..गेल्या वेळी नेमका आदित्य होता..आता काय?" राज 
"आता खरंतर तुम्हाला सांगायला हरकत नाही..." मेघा दोघांकडे बघत म्हणाली- "आमची सगळ्यांची एक थियरी होती...की तुम्ही दोघे वेगळे राहायला तयार होणार नाही" 
"असं का वाटलं तुम्हाला?" रमाने तिच्या नेहमीच्या सुरात विचारलं.
"अगं,तुम्ही दोघं ज्या प्रकारे एकमेकांना नुसतं एक-दोनदा भेटून एकत्र राहायला सुरुवात केलीत...ते लक्षात घेता सहा महिने बरोबर राहिल्यावर वेगळे का राहाल?"
रमाने उत्तर दिलं नाही. ती चेहऱ्यावरून थोडी चिडलेली वाटत होती. तिच्याबद्दल असं काहीतरी तिच्या तोंडावर पहिल्यांदाच बोललं गेलं होतं. आदित्यसुद्धा गप्प बसून राहिला.
"रमा, तुला वाईट वाटलंय असं दिसतंय पण तू खरंच इतकं मनावर नको घेऊ...मी मागे आदित्यला जे बोललो होतो तेच आज पुन्हा बोलणारे...अमेरिकेला येताना प्रत्येकाच्या डोक्यात काही भन्नाट कल्पना असतात...आयुष्याला 'यु-टर्न' किंवा 'राईट' टर्न मिळेल आणि खूप बदल होतील...मोस्ट ऑफ द टाईम तसं होत नाही...अमेरिकन कल्चरमध्येसुद्धा आपण आपलं 'चौकटी' असणारं इंडो-अमेरिकन कल्चर वसवतो आणि त्यातच रमतो, सण-वार आले की हळहळतो, अमेरिकन लोकांच्या बिनधास्त-बेफिकीर वागण्याचा हेवा करतो...मला माहित नाही अजून काही वर्ष राहिल्यावर यात फरक पडतो का? पण सुरुवातीची काही वर्षं तरी ही परिस्थिती असते हे मी अनुभवाने सांगतोय..."
"जीतबुवा मुद्दा काये?" राजने हसत विचारलं."राज एक मिनिट...मी सिरिअसली काहीतरी सांगतोय...जे तुला, मला लागू होतं..हं, तर मग अशा परिस्थितीत तुमचं येणं, एका घरात राहण्याचा निर्णय घेणं आणि आता सहा महिन्यांनी तितक्याच निर्विकार, बेफिकीरपणे वेगळं होणं या सगळ्याबद्दल आम्हाला अभिमान, हेवा, असूया असं सगळंच वाटतंय..इतकं आयडियल खरंच काही असतं का? असा प्रश्नसुद्धा पडलाय!"      
जीतच्या बोलण्याने रमाला बरंच बरं वाटलं होतं.
"वेल, ह. भ. प. जीतबुवा ठाकूर यांनी जे काही सांगितलं ते समस्त मंडळाचं प्रातिनिधिक मत आहे असं परचुरे-फडके यांनी समजावं आणि चूक-भूल द्यावी घ्यावी..मनीषा बाईंच्या लग्नाच्या या मंगल प्रसंगी  सर्व हजर कार्यकर्त्यांच्या चहापानाची सोय करण्यात आलेली आहे..आम्ही मनीषा बाईंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.." सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
"अरे चहापानाची सोय होणार होती ना?" राजने विचारलं.
"हो..तूच डिक्लेअर केलंस ते..मग कर की आता सोय" दर्शना म्हणाली.   
"मंडळात इतका महिला वर्ग असताना पुरुष मंडळी कष्ट घेत नाहीत..." राज म्हणाला.
"चला..दाखव मला चहा साखरेचे डबे..करते मी चहा..." 
दर्शना आणि राज किचनमध्ये गेल्यावर पुन्हा जीतने आदित्यकडे मोर्चा वळवला.
"पण आदित्य, खरंच इतकं आयडियल काही असतं का?"
"मला नाही माहित जीत...इट हॅपन्ड! जस्ट लाइक दॅट! हो की नाही गं रमा?"
रमाने मान डोलावली. मेघाने तिच्या बोलण्याबद्दल रमाला सॉरी म्हणून झालं. 
"आपणच त्या अनिताला आज रात्री फोन करून घेऊ..कारण तिला नाही तर आपल्यालाच गरज आहे..." मेघा म्हणाली. 
'ती जर का येणार नसेल तर मी रमाला एकटं टाकून वेगळं राहणार नाहीये' आदित्यच्या वाक्य तोंडावर आलं होतं. पण त्याने मोह आवरला.
"रमा, तुला इंडियातल्या फोटोंचा हेवा वाटतो ना? मग आज आपण इथल्या ख्रिसमस परेडचे फोटो काढायला जाउया..सण साजरे करावेत तर इथल्यासारखे...चांगले वेळ काढून सण साजरे करतात"
"जीत, जाऊ आपण परेडला...पण आता सवय झालीय मला..." रमा हसत म्हणाली. 
"तू संध्याकाळी मनिला सोडायला जातो आहेस ना?" मेघाने जीतला विचारलं.
"राज जाणारे..मी उद्या नितीनला आणायला जाणारे" 
"ए मला नक्की सांगा..माझा ऐन वेळी घोळ होईल..." 
"तुझ्याकडे बघून मला जुन्या हिंदी सिनेमातल्या हिरोच्या बहिणींची आठवण होतेय..." आदित्य म्हणाला.
"ए शी...काहीतरीच काय?"
"मग काय? त्यासुद्धा लग्नाला असल्या उतावळ्या असायच्या...सोडेल तुला राज..जाशील तू घरी....होईल तुझं लग्न"
"तू म्हणतोयस तर ठीके...पण काही बिघडलं ना तर तुझी जबाबदारी" मनीषा हसत म्हणाली.
संध्याकाळी राज मनीषाला एअरपोर्टला सोडून आला. रात्री मेघा-दर्शना-रमाने भेटून अनिताला फोन लावला. तिला यायला जेमतेम चार दिवस होते. तिने इंडियन स्टुडंट कमिटीला तिच्या येण्याबद्दल कळवलं होतं. रमाला आणि बाकी सगळ्यांना निरोप मिळाला नाहीये याचं तिला आश्चर्य वाटलं. मेघाने 'चार दिवसांनी भेटू मग बोलूच' असं सांगून फोन ठेवला.   

दुसऱ्या दिवशी सकाळी रमाने आदित्यला अनिताच्या येण्याबद्दल सांगितलं. नितीन पूर्वी तिथे राहिलेला असल्याने त्याला 'परतसेटल होण्यात विशेष त्रास होणार नव्हता.त्यात तो अनिताच्या आधी येणार होता. त्यामुळे नवीन अपार्टमेंट घेऊन त्याच्या युटीलिटी,इंटरनेट वगैरे फॉर्मलीटीस करणं सोप्पं होणार होतं. म्हणून नवीन अपार्टमेंट त्याने आणि आदित्यने रेंट करायची आणि रमाने अनिताबरोबर सेम अपार्टमेंट ठेवायची असं ठरलं.
"सो, तुझी नवीन रूम-मेट येतेय आणि माझा कधी न भेटलेला 'जुना' रूम-मेट येतोय"
"हं"
"रमा..मला पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे?"
"तोच म्हणजे?"
"सहा महिन्यांपूर्वी पडला होता तेव्हा एकत्र राहण्याबद्दल होता आता वेगळं राहण्याबद्दल आहे!"
"कोणता प्रश्न?"
"आपण करतोय ते बरोबर आहे ना?"
"आदि, माझंसुद्धा तेव्हाचं आणि आत्ताचं उत्तर तेच आहे...'आपण बोललोय याबद्दल..' प्लीज आता तू मला कन्फ्युस करतो आहेस" रमा थोडी चिडली.
"गम्मत करतोय गं"- तो हसत म्हणाला-"रमा, मला मजाच वाटतेय..आठवायला लागल्यापासून मी घरं बदलतोय! अमेरिकेला आल्यावर पण स्थैर्य नाही! आय जस्ट होप मला पुन्हा घर बदलायला लागणार नाही! किंवा लागलंच तर याच घरात परत यायला मिळेल.."
"हं" रमासुद्धा थोडी भावूक झाली होती. 

"तू एक काम कर...अनिता जेव्हा काही दिवस इंडियाला किंवा इथे कॉन्फरन्सला वगैरे जाईल तेव्हा तू मला राहायला बोलाव..आयडिया चांगली आहे ना?" आदित्यने भुवया उंचावत विचारलं.
"आदि, तू आता माझ्याबरोबर ऑफिशिअली फ्लर्ट करणारेस का?" रमाने विचारलं.
"वेल, माझ्या डोक्यात नव्हतं तसं..पण तू आता म्हणालीच आहेस तर-"
"परचुरे..बास..." ती हसत म्हणाली.
"ओके.." तो तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत राहिला. तिला जाणवल्यावर तीसुद्धा काही न बोलता उभी राहिली. बोलायला विषय नव्हता आणि ते दोघे असेच उभे राहिले असते तर कदाचित दोघांचा निर्णय बदलला असता. रमा आदित्यला काहीतरी खुण करून आत जायला वळली.
आदित्यने तिला पाठमोरी जाताना बघून, काहीतरी आठवून तिला हाक मारली. ती वळली. पण तिने वळताना नेहमीसारखे केस एका बाजूला घेतले नाहीत. 
'बहुतेक सगळंच बदललंय' आदित्य मनात म्हणाला.
"काय?" रमाने विचारलं.
"तुला काहीतरी द्यायचं होतं.." रमाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं. आदित्यने एक प्लास्टिकची पिशवी तिच्या हातात दिली.
"हे काय?" 
"तुझा पुढच्या महिन्यांत बर्थडे आहे ना..तेव्हा गिफ्ट द्यायला घेतली होती..बट आत्ताच देऊन टाकली" रमाने पिशवीतून टॉय स्टोरीच्या तिसऱ्या भागाची डीव्हीडी काढली. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं.
"मी बेट लावतो की तू रडणारेस" तो म्हणाला.
"काय?"
"थर्ड पार्ट बघून...आणि इतके दिवस तू काय मिस केलंस तेसुद्धा तुला कळेल..."
'मे बी मी यापुढे काय मिस करणारे ते मला आत्ता कळतंय' रमाच्या मनात आलं.
"नितीन दुपारी येतोय..त्याला आणायला मी जीतबरोबर थोड्या वेळात जातोय! मग माईककडे जाऊन आम्ही नवीन लीझ साईन करणारोत.." आदित्य डायनिंग टेबलवरचे पेपर्स गोळा करत म्हणाला. वेगळं राहायची वेळ एकदम जवळ आल्याचं रमाला जाणवलं.
"ओह...तू कधी शिफ्ट होणारेस?" तिने विचारलं. आदित्यने चमकून तिच्याकडे पाहिलं.
"तुला मला बाहेर काढायची एवढी घाई झालीय का?" त्याने निराशपणे विचारलं आणि खिडकीबाहेर बघायला लागला.
"नाही रे.." ती नर्व्हस होत म्हणाली. 
"आज जर का लीझ झालं, उद्या युटीलिटी कनेक्शन घेतलं की उद्या संध्याकाळीच शिफ्ट होईन मी.." त्याने तिच्याकडे पाहायला मान वळवली तर रमा त्याच्या शेजारी येऊन उभी होती. 
"तुला आठवतंय रमा, मी मागे म्हटलं होतं- आयुष्यातले बरेचसे प्रश्न ओब्जेक्टीव टाईप असतात...तुमच्याकडे उत्तर निवडायला बरोबर वाटणारे एकापेक्षा जास्त पर्याय असतात आणि त्यातला योग्य पर्याय निवडायचा..तोच पर्याय का निवडला याची स्पष्टीकरणं द्यायला लागली की गडबड होते...उत्तर बरोबर असेल तर कुणी स्पष्टीकरण वाचतही नाही पण चुकलं तर हमखास वाचतात"
"हं" 
"कधीकधी इच्छा होते जाणून बुजून चुकीचा पर्याय निवडायची..अशा वेळी काय करायचं असतं ते मात्र मला कळलेलं नाहीये" रमाने क्षणभर त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि बाजूला केला.
दोघे काही वेळ खिडकीबाहेर बघत उभे राहिले.  

त्या दिवशी दुपारी ठरल्याप्रमाणे नितीन आला. लीझ झालं. दुसऱ्या दिवशी नितीन आणि आदित्य युटीलिटीसाठी रजिस्टर करून आले. दुपारी आदित्यने एक बॅग नवीन अपार्टमेंटमध्ये नेउन ठेवली. दुसरी बॅग न्यायला तो आला तेव्हा रमाने त्याला अडवलं. 
"आदि, तू आजच्या आज का सामान शिफ्ट करतो आहेस? अनिताला यायला चार दिवस आहेत अजून..."
"नितीन आजपासून राहायचं म्हणतोय...त्याला एकट्याला रहा म्हणून मी इथे राहणं बरोबर दिसणार नाही" 
"आदि, तू म्हणालास ना की हिंदी सिनेमाचं बरं असतं..तिथे लोकांना एकमेकांबद्दल अचानक साक्षात्कार होतात..आणि मग हॅप्पी एंडिंग होऊन सिनेमा संपतो...खऱ्या आयुष्यात असं व्हायला पाहिजे होतं असं वाटायला लागलंय"
"रमा, हाच तर फरक असतो...सिनेमात आणि खऱ्या आयुष्यात! मनाला वाटणारी प्रत्येक गोष्ट बोलून दाखवता येत नाही, प्रत्येक रिलेशनला नाव देता येत नाही. काही नात्यांबद्दल, माणसांबद्दल, घटनांबद्दल खूप बोलून, त्यांना उलगडण्याचा प्रयत्न करत आपण त्यातली मजा घालवून टाकतो. मला आपल्या दोघांच्या बाबतीत तसं नाही होऊन द्यायचं. तसंही आपण एकमेकांपासून खूप लांबसुद्धा जात नाहीये..सो हे जे काही आपल्याला एकमेकांबद्दल वाटतंय ते निव्वळ एकत्र राहण्याने, २४ तासाच्या सहवासामुळे आहे की त्याहून जास्त काही आहे तेही येत्या काळात कळेलच...हॅप्पी एंडिंग न व्हायला आपली गोष्ट संपलीय कुठे?? इट विल गो ऑन..आपण बरोबर असू तोपर्यंत! आणि त्यानंतरसुद्धा..जस्ट लाइक दॅट"   
"आणि आपल्याला जे काही वाटतंय ते निव्वळ एकत्र राहण्यामुळे वाटत नव्हतं असं नंतर आपल्या लक्षात आलं तर आपण काय करायचं?" रमाने विचारलंच.
अमेरिकन एअरपोर्टला उतरल्यावर विसा ऑफिसरच्या 'तुमचा या देशात येण्याचा हेतू काय?' या पहिल्या प्रश्नाला आदित्यचं उत्तर होतं 'आय डोंट नो'. आज जवळपास सहा महिन्यांनी रमाने त्याला एक प्रश्न विचारला होता. त्याचं पुन्हा उत्तर तेच होतं-
"आय डोंट नो...एकीकडे असं वाटतंय आयुष्यातले हे गेले सहा महिने निघून जावेत..मला तुझ्याबद्दल काही वाटू नये...तुझं-श्रीधरचं माझ्यामुळे कधी भांडण होऊ नये..मी स्वतःला त्याच्या जागी ठेवून जेव्हा विचार करतो ना रमा, मला अमृता आठवते..मग माझा नैतिकता- भावनिकता असा गोंधळ सुरु होतो...आपण भेटलो यात श्रीधरची चूक काहीच नाही! पण तरी त्याच्या आणि पर्यायाने आपल्या 'इमोशनल बर्डन' मध्ये भर पडतेय.."
"आदि, मला इतका गुंतागुंतीचा विचार करता येत नाही..आपण भेटलो यात भले श्रीची चूक नसेल पण म्हणून त्याचं हक्क दाखवणं जस्टीफाय नाही करता येत..आणि प्रत्येक रिलेशनमध्ये असं असतं वगैरे मला खरंच नको सांगू या क्षणाला.." रमा चिडली.
"रमा,तू का चिडली आहेस? मी श्रीधरचा विचार करतोय आणि तू करत नाहीयेस म्हणून?"
"नाही...श्रीचा विचार तू त्याच्याबद्दल कळल्या दिवसापासून करतोयस हे माहितीय मला..पण म्हणून आपण एकत्र राहिलेले हे सहा महिने 'निघून जावेत' असं म्हणालास त्याचा जास्त राग आला मला..."
"रमा, तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस..माझं कन्फ्युजन समजून घे...मी जे बोललो ते निव्वळ श्रीधरशी स्वतःला रिलेट करून! तुझ्याबरोबर मला एकत्र राहायला आवडेल हे मी तुला आधीच बोललोय.."
दोघे काही वेळ गप्प उभे राहिले.
"पुढचं रोटेशन कुणाकडे करतोयस?" रमाने शांततेचा भंग केला.
"रोटेशन टाळायचा प्रयत्न करतोय..मला मरेच्या ग्रुपमध्येच काम करायचं आहे. निदान तेवढं मला नक्की माहितीय..मग रोटेशन टाळता आलं तर बरं! मरेला मी रिपोर्ट सबमिट केला तेव्हा त्याने कळवलं की त्याला माझं काम आवडलंय..सो तो मला चांगला प्रोजेक्ट देईल..आणि लौकर पी.एचडीसुद्धा पूर्ण करू देतो म्हणे तो!"
"आदि, नक्की तू हे बोलतोयस?" ती त्याच्याकडे पाहत राहिली.
"हो..आय नो..मला स्वतःलापण खरं वाटत नाहीये...पण मला मागे कुणीतरी म्हणालं की मला एक पी.एच.डी स्टुडंट असल्यासारखं बिहेव्ह करता आलं पाहिजे..निर्णय घेता आले पाहिजेत.." तो हसत म्हणाला.
"खूप चिडले होते आदि मी तुझ्यावर त्या दिवशी...पण म्हणून का होईना तू निर्णय घ्यायला शिकलास.." ती हसत म्हणाली.
"सो..रमा फडके...तुझ्याबरोबर राहिलेले सगळे दिवस सुपर्ब होते...मी तुला खूप मिस करेन"
"मी सुद्धा" 
"मी काल एका कार्यक्रमात ऐकलं..एका फूड क्रिटिकला एका इंटरव्यूमध्ये विचारलं होतं- की आयुष्यात तुम्ही चाखलेल्या, खाल्लेल्या पदार्थांपैकी काय परत खायला आवडेल...त्यावर त्याने उत्तर दिलं- 'मला आत्तापर्यंत सर्वात जास्त आवडलेली रेसिपी पुन्हा 'पहिल्यांदा' खायला आवडेल'...रमा, खरंच आयुष्य सिनेमासारखं असेल तर मला रिवाइंड बटन दाबून गेले सहा महिने पुन्हा-पुन्हा 'पहिल्यांदा' जगायला आवडतील...नंतर काय होणारे याचा विचार न करता..."  
"आदि, हा गेल्या सहा महिन्यातला बेस्ट 'परचुरीझ्म' होता.." रमा म्हणाली. 
"परचुरीझ्म? काय रमा? तूसुद्धा?" आदित्यने हसत मान डोलावली. तिने हसत कान धरले. 
"येऊ का?" त्याने बॅग उचलत विचारलं. रमाने एक मोठा श्वास भरून घेतला आणि मान डोलावली.
आदित्य बाहेर पडला.
'हॅप्पी एंडिंग न व्हायला आपली गोष्ट संपलीय कुठे?? इट विल गो ऑन..आपण बरोबर असू तोपर्यंत! आणि त्यानंतरसुद्धा..जस्ट लाइक दॅट' रमा त्याचं वाक्य मनात घोळवत राहिली.

समाप्त 

24 comments:

Yogini said...

hmmm..
aawadalee..:)

Chaitanya Joshi said...

@Yogini:
Thanks a lot :)

nik said...

End could have been a little better.I think you should extend the story with some more parts.

Dk said...

Hey Chaitanya,
nice blog !
I'd have loved to read another end... may be a happy, simple end! But I guess the another story starts from here... Keep writing :)

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.
Chaitanya Joshi said...

@Nik:
I appreciate your honest opinions and encouragements throughout the story.
I guess end might have seemed a bit rushed and not as sweet as the whole story was. However, I just preferred to stay with my original idea of the end.
Now, about your suggestion, I have kept the end kind of open..so if I can think of something better..I'll surely write a few more parts :)
Once again, thanks a lot for all your comments..cheers :) Keep visiting :) :)

Chaitanya Joshi said...

@Deep:
Yeah, that is more like the concept of it..life moves on!
So I had to change the mood of the story to stop.
Thanks a lot for your comment :)
Keep Visiting :)

Chaitanya Joshi said...

@Aditya:
Khup khup dhanyavaad mitra!!
Daav ardhavat zalay khara...pan definite end denyaat me goshtila 'fairy tale' kela asata asa mala vatla..aditya-ramaashi lokanni relate vhava ashi maazi ichha hoti jee kitpat purna zali mahit nahi..pan happy notevar thambun me 'reality' ghalvali asati asa vatla...
aani var ekaa pratikriyet lihila tasa- end open thevlaay me..so rama-aditaychi goshta mala ajun ulagadli tar nakki lihin pudhe :)
ashich bhet det raha :)

Whats in the name...! said...

Mast.. I specially liked the end..
We Indians are not much in to such open end stories.. Nice try ..:)

anup said...

Superb end. Ekdam unexpected. Mala watla hota, tu happy ending karashil.. paN ekdam open end kela ahes.. :)
Mazya mate yaacha sequel hou shakto.

Vidya Bhutkar said...

Very Nice story. I couldnt get started seeing 20 parts, but once I started today, only stopped at the end. I liked the flow, characters, their thought processes and the end. It is off course life cannot come to an end like a movie. Totally agreed !
One small thing though, somehow the name of the characters,'Rama' sounds older than Aditya. :)
Well Keep writing.
-Vidya,

pravin sawal said...

Kharach mitra mast stoy aahe yaar karan pratyek partchi me aatutartene vaat baghat hoto kadhi lihishil hyachi khup velanantar ashi story vachali yaar
mast ekdam i hope ajun pan pudhe asach lihit jashil wid naveen kalpana i guess
pan kharach yaar short & sweet
keep it up....!!

Unknown said...

End chan zala

bhagya said...

I think story starts from here.
Chaitanya now please start writing sequel of 'Just Like that!!!'
Plz... I loved this story.

Anand said...

Actually I don't feel this is an end.
I mean we are not reaching to a conclusion. The whole story had raised our expectations a lott!.. This looked like an anticlimax.
I am waiting for a little different end, may be on the same lines, but with different situations!

~Anand

Chaitanya Joshi said...

@Atul:
Thanks a lot!
I'm glad you were 'open' for this type of end :) :)

Chaitanya Joshi said...

@Anup:
धन्यवाद्स! गोष्टीच्या या स्टेजला वाचक म्हणून सगळ्यांना अपेक्षित असणारा 'सुखांत' पात्रांच्या दृष्टीकोनातून योग्य ठरला नसता!
राहता राहिला सिक्वेलचा प्रश्न..हो..तो नक्की लिहिता येऊ शकतो...आधी लिहिलं तसं- रमा-आदित्यचं नातं मला उलगडेल तसं मी पुढे लिहिण्याचा विचार करेन :)

Chaitanya Joshi said...

@विद्याताई:

खूप खूप आभार्स! तुम्ही सलग २० भाग वाचलेत यातून मला लिहायला जमलंय याची पावती मिळाली..त्यासाठी पुन्हा धन्यवाद!
केलेल्या शेवटाबद्दल मी पहिल्यापासून ठाम होतो कारण तो मला कथेच्या, पात्रांच्या अनुषंगाने योग्य वाटला. आणि नावाचं सांगायचं तर- मी नव्हता विचार केला..

Chaitanya Joshi said...

@Pravin Sawal:
धन्यवाद! मला आशा आहे की प्रत्येक भागात तुमच्या वाट बघण्याला न्याय मिळाला..
परत नक्की लिहीन...जसं सुचेल तसं! अशीच भेट देत राहा :)

Chaitanya Joshi said...

@hanumant jadhavrao:
धन्यवाद!

Chaitanya Joshi said...

@Bhagya:
Thanks for your comment :)
Yeah, As I mentioned earlier, I would think about writing a sequel of sort..No plans as yet though!

Chaitanya Joshi said...

@Anand:
'This looked like an anticlimax'--> I agree but I had decided to stop at this point when I started with story. A lot of people felt the same as you do and I acknowledge that. I would just need some more time to think, explore before I can get back to these characters again :) :)

Tunuchini said...

Heyyy,
Wanna write a lot.. But not for public.. ;) End is perfect n practical.. ;) Maala haach end apekshit hota.. It makes u feel like, Arre, ajun bhuk bhagli nahii pan man trupt zala.. ;)

Chaitanya Joshi said...

@Tunuchini:
Finally story vachlis..dhanyavaad!!
--->Arre, ajun bhuk bhagli nahii pan man trupt zala.. ;)
mala aawadali aahe hi comparison!
Keep visiting :)