Pages

Sunday, July 22, 2012

देवकण, सृष्टीरहस्य, वगैरे वगैरे..

१९२५ साली अमेरिकेतील टेनेसी राज्यात 'स्कोपेस मंकी ट्रायल' नावाचा खटला गाजला होता. स्कोपेस नावाचा शिक्षक शाळेतल्या मुलांना 'इवल्युशन' अर्थात उत्क्रांती विषय शिकवत होता म्हणून राज्य सरकारने त्याच्याविरुद्ध खटला भरला आणि त्यात तो दोषीही ठरला. 'बटलर' नावाच्या कायद्यानुसार बायबलमधल्या नोंदींच्या विरोधात जाऊन माणसाच्या अस्तित्वाबद्दल/जन्माबद्दल/उगमाबद्दल सरकार प्रमाणित शाळा किंवा विद्यापीठांमध्ये शिकवणं कायद्याने गुन्हा होता. आज अचानक या खटल्याबद्दल आठवण्याचं कारण म्हणजे अलीकडे लागलेला देवकणाचा अर्थात 'हिग्ग्स बॉसोन' नावाच्या 'गोष्टीचा' शोध! जगाच्या उत्पत्तीचा शोध लावण्याचं काम बहुतेक जगाच्या उत्पत्तीपासून सुरु असावं! पण गेल्या शतकात माणसाने विज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी प्रगती केली आणि अखेर संशोधन फळाला येऊन त्याला 'देवकण' गवसला. सोप्या शब्दात जर का या बॉसोनच्या तयार होण्याबद्दल सांगायचं तर एकमेकांच्या दिशेने येणारे दोन वेगवान शक्तीस्त्रोत जर का एकमेकांवर आदळले तर त्यातून वास्तविक अस्तित्व असणारे, वस्तुमान असणारे पदार्थ निर्माण होतील. परंतु या पदार्थांचं अस्तित्व जाणवून, त्यांचं वस्तुमान काढेपर्यंत हे पदार्थ टिकत नाहीत कारण ते खूप अस्थिर असतात. शिवाय त्यांचं वस्तुमान काढण्याइतका मोठा कण जर का मिळवायचा असेल तर टक्कर होणारे स्त्रोत तितकेच शक्तिशाली असले पाहिजेत. अलीकडे लागलेल्या शोधात स्थिर बॉसोन शोधण्यात शास्त्रज्ञाना यश आलं आहे. 


हा शोध कसा केला गेला?कुणी केला?कधी केला?त्याचं महत्व काय? वगैरे वगैरे प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी हे संशोधन करणाऱ्या मंडळींनी दिली आहेत. पण माझा प्रश्न फार मुलभूत आहे. कदाचित त्याचं वस्तुनिष्ठ उत्तर मिळणं अवघड आहे. प्रश्न वस्तुनिष्ठ असण्यापेक्षा जास्त तत्वनिष्ठ म्हणता येईल कदाचित...तर 'नमनाला घडाभर तेल' घालून झाल्यावर प्रश्न काय तेही सांगतो- हा बॉसोन शोधण्याचा अट्टाहास का? म्हणजे जगाच्या निर्मितीचं रहस्य जाणून घेण्यात माणसाला रस आहे हे जरी मला संपूर्णपणे मान्य असलं तरी हा शोध जगापुढे इतकी प्रसिद्धी देऊन मांडण्यात मिडीयाने, संशोधकांनी काय साधलं असा प्रश्न मला पडतो. संशोधक म्हणतात की आत्तापर्यंतचा सर्वात मोठा शोध आहे. पण जगातल्या तमाम जनतेला हा शोध नीट कळला आहे का या  प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं असेल. काही दशकांपूर्वी जेव्हा इलेक्ट्रोनचा शोध लागला तेव्हासुद्धा लोकांना त्या शोधाचं महत्व कळलं नव्हतं पण आज आपण पाहत असलेली तांत्रिक प्रगती ही त्या एका शोधामुळे झाली असं स्पष्टीकरण तज्ञ देताना दिसतायत. याच प्रकारे येत्या काळात बॉसोनच्या शोधानेसुद्धा क्रांतिकारी बदल होतील अशी अपेक्षा आपण करूया असं त्यांना म्हणायचं आहे. भौतिकशास्त्र हा विषयाबद्दल माझा आकस नाही परंतु गेल्या शतकातला सगळ्यात मोठा शोध म्हणून आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताकडे पाहिलं जातं. पण त्या सापेक्षता सिद्धांताचा आपण व्यावहारिक (Applied) जगात नेमका काय उपयोग केला? हॉलीवूडला काही अफलातून साय-फाय सिनेमे निर्माण करायला मिळालेला एक विषय सोडून विशेष काहीच नाही. या बॉसोनच्या शोधाच्या बाबतीत ही शक्यता नाकारता येत नाही. 

जगाच्या रहाटगाडग्याकडे पाहण्याचे लोकांचे ठराविक दृष्टीकोण आहेत. काही अखंड कर्मयोगाची कास धरतात, त्यांना जगाच्या निर्मितीशी काही घेणं-देणं नसतं. रोजची आठ तासाची मेहनत, दोन वेळेचं जेवण, स्पर्धा-असूया-कौतुक, आठ तासाची झोप आणि इतर वेळेत मनोरंजन, नामस्मरण वगैरे करणं हा त्यांचा आयुष्याकडे, जगाकडे पहायचा दृष्टीकोण. दुसऱ्या प्रकारचे लोक स्पिरिचुअल, रिलिजिअस टाईप मध्ये येतात. जगाला कंट्रोल करणाऱ्या कुठल्यातरी शक्तीची ते उपासना करतात आणि त्या शक्तीशी कनेक्ट होणं हे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ठ असतं. जगनियत्यांच्या योजनेत आपल्याला एक भूमिका राखून ठेवली आहे आणि जगाचा कर्ता-करविता आपली काळजी घेणार आहे याची या दैववादी लोकांना खात्री असते. तिसऱ्या प्रकारचे बुद्धिवादी असतात.त्यांची कर्मवाद किंवा दैववाद अशी विशेष भूमिका नसते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी करायला आवडतात. ते करत असलेल्या प्रत्येक कृतीचं समर्थन करता येणं त्यांना शक्य असतं. जर का जगातल्या लोकांचे ढोबळपणे पडणारे हे तीन प्रकार आपण मान्य केले तर आता पुन्हा मुळ विषयावर येतो. यापैकी कुठल्याही प्रकारच्या मंडळींना बॉसोनच्या शोधाने काय विशेष फायदा होणारे? 

काही वेळासाठी आपण असं गृहीत धरूया की जगाची उत्पत्ती हे रहस्य कधीच नव्हतं किंवा जगाची निर्मिती कशी झाली हे शोधण्याचा अट्टाहास बाजूला ठेवून जर का जगाकडे निव्वळ एक साधं नियंत्रित, अखंड कार्यरत यंत्र (Simple Perpetual Controlled Machine) म्हणून पाहिलं आणि त्याची उत्पत्ती कशी झाली हे शोधायचं थांबवलं तर जगात आजघडीला महत्वाच्या कितीतरी समस्या आहेत. ग्लोबल वॉर्मिंग याच वेगाने सुरु राहिलं तर जगच राहणार नाही, एड्स आणि कॅन्सरने आज जगात निर्माण केलेली भीती जर का नष्ट करायची असेल तर या आजारांवर उपाय शोधणं जास्त महत्वाच आहे, आण्विक युद्धाची टांगती तलवार डोक्यावर लटकते आहे. मला असलेल्या अल्प-स्वल्प माहितीप्रमाणे या कुठल्याच समस्येवर हा बोसॉन उत्तर देऊ शकणार नाही. आईनस्टाईनला आपण गेल्या शतकातला सर्वात मोठा भौतिक शास्त्रज्ञ मानतो. त्याने न्यूटनच्या भौतिकशास्त्रातल्या संकल्पना समूळ बदलल्या. लोकांना काळ या चौथ्या मितीबद्दल कळलं. पण या शतकातल्या सर्वात मोठ्या शोधाकडे- बोसॉनकडे या काळ संकल्पनेबद्दल आणि त्यापुढे पर्यायाने विचारल्या जाणाऱ्या काल भ्रमण यंत्राबद्दल (टाईम मशीन) कुठलीही उत्तरं नाहीत. गेली काही शतकं माणूस चंद्रापासून ते सगळ्या आकाशगंगेत कुठली जीवसृष्टी, पाणी किंवा तत्सम काहीही आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण बिचारा बोसॉन या बाबतीतसुद्धा काही उपयोगाचा नाही. मग त्याला शोधण्याचा अट्टाहास का? त्यासाठी अब्जावधीने पैसा खर्च करणं का?कशासाठी?    

मला कधी कधी खूप नवल वाटतं. आपण आपल्यासमोर असणाऱ्या खऱ्या समस्यांचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी विश्व्युत्पत्ती, माणसाचा उगम या गोष्टींवर उहापोह करतो. संशोधक, लोकनेते, समाजाभिमुख माणसांनी भौतिक आयुष्यात येणाऱ्या समस्या आधी सोडवाव्यात. विश्वाच्या उत्पत्तीचा शोध अजून ५०..१००...किंवा ५०० वर्षांनी लागला तरी हरकत नाही पण तोपर्यंत जग वाचवणारं संशोधन होणं आणि निसर्गात समतोल निर्माण करणं हे अतिशय गरजेचं आहे. जसं विज्ञानाचं आहे तसंच आपल्या दैनंदिन आयुष्याचं! आपण रोजघडीला जगत असणारं आयुष्य जसंच्या तसं स्वीकारणं जास्त चांगलं. आपण करत असलेलं काम इमानेइतबारे, जगनिर्मात्याच्या कुठल्याही योजनेचा विचार न करता केलं तर सोप्पं जाणार नाही का? स्वतःशी, लहानपणापासून शिकवल्या गेलेल्या नितीमुल्यांशी प्रामाणिक राहून, आजूबाजूच्या माणसांना, प्राण्यांना मदत केली तर असा कुणी जग निर्माता खरोखर असेल तर तो नक्की भेटेल आणि त्याची सिक्रेट योजना आणि त्यातली आपली भूमिका तो आपल्याला नक्की सांगेल. (हा परिच्छेदाचा दुसरा भाग आध्यात्मिक प्रगतीच्या गप्पा मारत जगरहाट समजावणाऱ्या मंडळींसाठी)

का?कसं?कधी?कोण? असे ककारी प्रश्न पडणं हे मनुष्याची बुद्धी शाबूत असल्याचं, जिवंत असल्याचं लक्षण आहे. नव्हे, इतर प्राणी आणि माणूस यांच्यातला तोच सगळ्यात मोठा फरक आहे. या फरकामुळेच आज जगावर माणसाची एकहाती सत्ता आहे. हा अखंड फाफटपसारा मांडल्यावर त्याचं नियंत्रण करणं आणि जगात समन्वय राखणं हे अर्थात माणसाचं काम आहे. तेव्हा ते कसं नीट करता येईल याकडे लक्ष देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे. बॉसोनच्या बाबतीत बोलायचं तर हे संशोधन करावं किंवा त्यावर इतका अब्जावधी पैसा खर्च करावा की नाही यावर भाष्य करण्याचा मला अर्थार्थी अधिकार नाही परंतु मला असं जरूर वाटतं की जी प्रसिद्धी आज या संशोधनाला मिळाली तशीच प्रसिद्धी व्यावहारिक जगातल्या समस्यांच्या उपायांवर चाललेल्या संशोधनाला मिळायला हवी. ग्लोबल वॉर्मिंग पासून ते पाणी प्रश्नापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी होत असलेलं संशोधन लोकांना कळायला हवं, त्यांचं महत्व कळायला हवं, त्यांची भीषणता जाणवायला हवी. 

विज्ञान आणि धर्म यांच्यात चाललेलं शीतयुद्ध काही शतकं जुनं झालंय. २१व्या शतकात शिक्षण झाल्यामुळे, चार बुकं वाचल्यामुळे मी अर्थात विज्ञानाच्या बाजूचा आहे. पण त्याचा अर्थ माझा देवावर विश्वास नाही असा होत नाही. जग चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे आणि तिच्यावर माझा विश्वास आहे. येत्या काळात आपल्याला विश्व कसं निर्माण झालं हे कळलं तर कदाचित पुढच्या पिढ्यांचा देवावर किंवा तत्सम कुठल्याही शक्तीवर विश्वास राहणार नाही अशी शंका वाटते. आपण राहतो ते जग समजून घेण्याचा हा 'बॉसोन' प्रयत्न म्हणूनच जास्त हास्यास्पद वाटतो.   


टीप : खरंतर मी ब्लॉग समर्पित करायच्या भानगडीत पडत नाही परंतु या विषयावर माझ्या विना-अधिकार कल्पनांवर मैत्रीच्या अधिकाराने दिलखुलास टीका करणाऱ्या गौरवला हा ब्लॉग समर्पित! :D 

  
चैतन्य 

Saturday, July 14, 2012

जस्ट लाईक दॅट ५

आत्तापर्यंत:

"मला ही डिस्पोझेबल प्लेट्स ही कल्पना जाम आवडली आहे.घासायला भांडी कमी..आपण नेहमी वापरायला याच आणूया का?" आदित्यने हसत विचारलं. रमाने जेवण केल्यामुळे भांडी घासायचं काम त्याने घेतलं होतं.
"काही गरज नाही. तुझी प्लेट तू घासशील आणि माझी प्लेट मी घासेन..कशाला पाहिजेत डिस्पोझेबल प्लेट्स?" रमाने उरलेली भाजी एका भांड्यात काढत म्हटलं.
"हो ते पण ठीक आहे!आपल्याला काही भांडी कमी पडणार नाहीत ना? मी आईला एक लिस्ट दिली होती..त्यातली सगळी भांडी मी आणली आहेत मी"
"हो रे..खरंतर कित्येक गोष्टी डबल आहेत आपल्याकडे.मसालेसुद्धा कित्येक महिने पुरतील.." आदित्यने भांडी घासायचं थांबवून चमकून तिच्याकडे पाहिलं. त्याची नजर तिला समजली. एकत्र राहायची दुसरी समाधानकारक सोय होईपर्यंत काही महिन्यांपुरती सध्याची सोय कंटिन्यू करायचं दोघांनी ठरवलं होतं. तिने नजर फिरवली आणि दुसरं काहीतरी करायला लागली. त्याने पुन्हा भांडी घासण्याकडे लक्ष वळवलं.


"सगळ्यांना खूप नवल वाटलंय आपण एकत्र राहण्याचं" आदित्यने पुन्हा शांततेचा भंग केला.
"हो आणि सगळ्यांना नवल वाटतंय या गोष्टीचं मला नवल वाटतंय..मला कधीच वाटलं नव्हतं की अमेरिकेत माणसं असा विचार करत असतील" 
"अमेरिकेला असली तरी माणसांची भारतीय मनोवृत्ती कशी बदलणार? खरं सांगायचं तर आपण थोड्या युनिक सिचुअशनमध्ये अडकलो म्हणून..नाहीतर आपणसुद्धा इतरांसारखे राहिलो असतो आणि भविष्यात कुणाच्यातरी असं करण्याने आपल्याला नवल वाटलं असतं. माझ्या मते सोसायटीचा घटक म्हणून आपण परंपरांचे पाईक असतो. रूढ झालेल्या पद्धतींमध्ये काही फरक पडला तर आपण आधी भांबावतो. मग तो बदल सकारात्मक वाटला तर स्वीकारतो आणि बदल करणारे पुढारी होतात"
"परंपरांचे पाईक..बापरे..तू खूप पुस्तकं वगैरे वाचतोस का? आणि हो तो पुढारीवाला पार्ट आवडला मला..पण आपल्या केसमध्ये हे क्रेडीट आपल्या दोघांचं आहे"
"हो हो..मी कुठे नाही म्हणतोय? आणि वाचनाचं म्हणालीस तर माझ्या बाबांचं पुस्तकांचं दुकान आहे..मी गेले काही महिने वेळ घालवायला दुकानात बसायचो..वाचन व्हायचं..त्यामुळे बोलताना नकळत असे अवघड शब्द सुचतात.."
"एकीकडे असे अवघड शब्द बोलतोस आणि तू म्हणत होतास की की तुला आपली भाषा न बोलणाऱ्या लोकांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये.."
"हो..बरोबर आहे की..प्रॉब्लेम त्यांना झाला असता" तो हसत म्हणाला.
"हां..पण माझ्या बाबांना आवडतात अशी अवघड मराठी बोलणारी माणसं...म्हणजे पुढे मागे मराठी भाषा वाचवायला चळवळ वगैरे सुरु झाली तर माझे बाबा नक्की असतील त्यात..बाय द वे..दॅट रीमाइंडस मी..तू त्यांच्याशी बोलणारेस ना?" रमाने सावध होत विचारलं.
"हो बोलेन की..त्यात काय एवढं" तो ओशाळून हसत म्हणाला.
"मग सकाळी फोन करेन मी त्यांना..गुड नाईटरमा तिच्या खोलीकडे वळत म्हणाली.
"रमा..एक मिनिट..."आदित्यने तिला थांबवत विचारलं.
"काय?" तिने केस मानेवरून पुढे घेत एका बाजूला केले आणि ती वळली.
".." आदित्य क्षणभर थांबला..."..मला खरंच तुला परत विचारायचं आहे...आपण करतोय ते योग्य आहे ना?आर यु शुअर..अबाउट ऑल धिस?"
"आपण बोललोय आदित्य याबद्दल..तू असा प्रश्न विचारून मला गोंधळात टाकतो आहेस.."
"गोंधळ उडालाय खरा..म्हणजे नाही उडालाय..म्हणजे..सगळयांना प्रश्न पडलाय की आपलं एकत्र राहणं याला निव्वळ तडजोड हे कारण नाही.."
"मग असं काही आहे का?" रमाने विचारलं.
"नाही.." 
"मग विषय संपला..गुड नाईट..सकाळी भेटू..उद्या तू चहा करणारेस ना?"
"..हो..गुड नाईटतो त्याच्या बेडरूमकडे वळला.

गेले दोन दिवस पलंगावर आडवं पडल्यावर त्याच्या डोक्यात हेच विचार चालू होतेआयुष्यातले महत्वाचे निर्णय त्याने कधीच स्वतःचे स्वतः घेतले नव्हतेत्याने काय शिक्षण घ्यायचं हे कायम कुणीतरी दुसरं ठरवायचा आणि तो मान्य करायचाअमेरिकेला येण्याचा निर्णयसुद्धा कुणीतरी सुचवलं म्हणून त्याने घेतला होतारमाबरोबर राहण्याच्या बाबतीत मात्र भलतंच घडलं होतंगमती-गमतीत एकत्र राहण्याच्या पर्यायाचा उल्लेख करणं वेगळं होतंपण पुढच्या घडामोडी बऱ्याच पटापट घडल्याराघवने सांगितलं तसं केअर टेकर फ्रेंडली 
नव्हतात्याने थोडसं लांब दुसरं अपार्टमेंट रेंट करायचा किंवा दुसरीकडे जाऊन काही इतर लोकांबरोबर राहण्याचा सल्ला दिलापण राज-जीतमुळे आदित्य आणि मेघा-दर्शुमुळे रमाला तिथेच जवळ राहायचं होतं.  
"आम्ही दोघे जर का एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहिलो तरआम्हांला दोघांना एकत्र एक अपार्टमेंट मिळेल ना?" आदित्य बोलून गेलाजीत-राज-रमा-मेघा-दर्शु इतकंच काय तर केअर टेकर माइकसुद्धा क्षणभर भांबावला.
"हो हो..मग माझी काहीच हरकत नाही..शेवटी एका घरात  जणांनी राहावं हा नियम पाळला जातोय हे बघणं माझं काम..मग दोघे 
कोण आहेत याच्याशी मला काही घेणं-देणं नाहीमाईकने स्वतःला क्षणात सावरून हजरजबाबीपणे उत्तर दिलं.
"ठीके..आम्ही तुला थोड्या वेळाने येऊन भेटतोराजने विषय वाढण्याआधी आवरता घेऊन सगळ्यांना तिथून बाहेर काढलं.
 जण बाहेर येऊन उभे राहिलेतेवढ्यात त्यांना कॉलेजमधून परत येणारी मनीषासुद्धा येऊन भेटलीचर्चेचा विषय अर्थात आदित्यने 
त्याने आणि रमाने एकत्र एका घरात राहण्याचं सोडलेलं पिल्लू.
"गाय्स..धिस इस अमेझिंग..मला माझे मुंबईतले दिवस आठवले.." इति मनीषा.
"तुम्ही खरंच असं काही करणार आहात?" मेघाने विचारलं.
"तुम्ही डेंजरस आहात..आम्हांला काहीच कल्पना दिली नाहीत.." राज
"म्हणजे..कल्पना वाईट नाहीये...पण--" दर्शु
सगळ्यांकडे प्रश्न वेगवेगळे असले तरी त्यांचा रोख आदित्य-रमाने एका घरात एकत्र राहायचं ठरवलं या एकाच गोष्टीकडे होताआदित्यला जाणवलं की लोक कारण नसताना रमाकडे बघतायतत्याने सगळ्यांना थोडा आवाज चढवत थांबवलं.
"अरे...सायलेन्स..एक मिनिट..मी त्या माईकला घोळत घ्यायला काहीतरी पिल्लू सोडलं..मी आणि रमाने एकत्र राहायची कल्पना गम्मत म्हणून डिस्कस केली होतीयात तिचा काही संबंध नाही..आणि रमा..सॉरी..मी असं बोलायला नको होतं"
"ओके..मग आता आपण काय करणार आहोत?" जीत इतका वेळ काही बोलला नव्हता.
"पण काही दुसरा पर्याय नसेल तर आम्ही एकत्र राहू शकतो ना?" हा अनपेक्षित प्रश्न रमाकडून आल्यावर आदित्यसकट सगळ्यांनी 
चमकून तिच्याकडे पाहिलं. 

रमा कुशीवर वळलीतिलाही तो प्रसंग जसाच्या तसा आठवत होतातिला त्या निर्णयाचा अजून तरी पश्चाताप झाला नव्हताभारतात गोष्ट वेगळी होतीतिथे ती एका खूप मोठ्या शहरात राहत होतीसामाजिकआर्थिक निकष वेगळे होतेआता देश बदलला. 
लहानपणापासून गर्दीत मिसळण्याचे प्रयत्न करण्याचे दिवस आता राहिले नव्हतेमुख्य म्हणजे गर्दीच राहिली नव्हतीत्यामुळे आता 
तिची वेगळी ओळख असावी असं तिला वाटणं फार सहाजिक होतंआदित्य हा एक प्रकारे तडजोड-सोयीस्कर प्रकार होतामुलगा 
वागा-बोलायला चांगला होतादुसऱ्या शहरात वाढला असला तरी घरचे संस्कारचालीरीती आपल्यासारख्याच असतील हे अजून एक 
कारण होतंतिने निर्णय घेऊन झाला होता. 

आयुष्यातला तिचा पहिलाच मेजर निर्णय..कोणतंही प्लानिंग  करता घेतलेला..आयुष्यातला त्याचा पहिलाच निर्णय..त्याचा त्याने 
घेतलेला!!
'जस्ट लाईक दॅट!'

क्रमशः

भाग ६ इथे वाचा